भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना भूमिगत स्थानके व बोगद्यांमध्ये आयबीएस प्रणाली उभारणे, संचालन व देखभालीची जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा अखंड व्हॉइस व डेटा कनेक्टिव्हिटीचा लाभ मिळणार असून सर्व दूरसंचार सेवा प्रदाते लवकरच स्थानके व बोगद्यांमध्ये सिग्नल सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, अखंड आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
भुयारी प्रवासात इंटरनेट नसल्यामुळे प्रवाशांना 'मेट्रो ॲप'द्वारे ई-तिकीट काढताना किंवा युपीआय पेमेंट करताना प्रचंड अडचणी येत आहेत.सुरक्षा आणि संपर्क: मेट्रो मार्ग जमिनीखाली सरासरी १८ मीटर खोल आहे. अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत नातेवाईकांशी संपर्क साधणे कठीण होत आहे. प्रवासादरम्यान कार्यालयीन कामे किंवा मनोरंजनासाठी इंटरनेट वापरणे शक्य होत नाही.