Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. १४ जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि शिक्षणाचा अभाव याविरोधात फुले दाम्पत्याने दिलेला लढा या मालिकेतून दाखवण्यात आला. मात्र आता त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरच ही मालिका संपणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीचा आहे. मालिकेच्या निर्मितीसाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये समतोल राहत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कालखंडापर्यंतच कथा दाखवण्याचे ठरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मालिका संपत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना त्यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या या महान व्यक्तींच्या जीवनावरील मालिका इतक्या कमी भागांमध्ये संपत असल्याचे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या विचारांची आणि कार्याची अधिक व्यापक मांडणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मालिका बंद होत असली तरी फुले दाम्पत्याची कथा इथेच थांबणार नसल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात एका नव्या माध्यमातून आणि वेगळ्या स्वरूपात ही कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावर आधारित नवा प्रकल्प लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी