Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळा २०२७ च्या कामकाजासाठी श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांची नियुक्ती

Nashik Kumbh Mela : आगामी नाशिक कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामकाजासाठी पंचवटी तपोवन येथील दिगंबर आखाड्यात महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय पंच दिगंबर अणी आखाडा यांच्या वतीने श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांच्यावर कुंभमेळा व्यवस्थापनाशी संबंधित समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कुंभमेळ्याच्या काळात आखाडे, खालसे तसेच स्थानिक मंदिरांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्न याबाबत शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे महत्त्वाचे कार्य श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री पार पाडणार आहेत. तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून साधू-महंतांच्या अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.



या नियुक्तीनंतर दिगंबर आखाडा श्री नाशिक क्षेत्र आद्य संत-महंत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये साधू-संत, आखाडे, खालसे आणि स्थानिक धार्मिक स्थळांच्या सुविधा व समस्यांचा योग्य समन्वय होणे आवश्यक आहे. या दृष्टीने शास्त्री यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कुंभमेळ्याशी संबंधित बैठका, प्रशासनाशी होणाऱ्या चर्चा तसेच विविध विकासकामांबाबत आखाड्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे कार्यही ते करणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे संत-महंतांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या प्रसंगी श्रीमंत रामसनेहीदास, महंत श्री रघुनंदनदासजी, महंत श्री शंकरदास, महंत श्री विष्णूदास, महंत श्री माधवदास, महंत श्री रामकिशोरदास, महंत श्री रामबाबूदास, महंत नरसिंगदास, महंत चंद्रमदास यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. तसेच हरिभक्त पारायण माधवदाची राठी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.


कुंभमेळा समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी


अखिल भारतीय पंच दिगंबर अणी आखाड्याचे श्रीमंत विष्णूदास महाराज व उपश्रीमहंत माधवदास यांच्या हस्ते श्रीमंत रामकिशोरदास शास्त्री यांची ही नियुक्ती करण्यात आली. सर्व आखाड्यांतील संत-महंतांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असून कुंभमेळ्याच्या कामकाजात त्यांचा अनुभव आणि समन्वयक भूमिका उपयुक्त ठरणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान