Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन (सीओए)च्या निर्णयाला फेटाळून लावले. भारताने या न्यायालयाला बेकायदेशीर ठरवत म्हटले की, या प्रकरणावर सुनावणी करण्याचा अधिकारक्षेत्र या न्यायालयाला नाही. परराष्ट्र मंत्रालयाने (एमइए) निवेदन जारी करून स्पष्ट केले की, सीओएने दिलेल्या निर्णयांचा भारताच्या कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही. भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णयही पुन्हा स्पष्ट केला आहे. (Indus Water Treaty)



परराष्ट्र मंत्रालयाने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनला पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहे. भारताचे म्हणणे आहे की, जागतिक बँकेने सिंधू जल करारातील नियमांचे उल्लंघन करून या न्यायालयाची स्थापना केली होती. त्यामुळे भारत या न्यायालयाचा कोणताही निर्णय किंवा आदेश मान्य करत नाही. एमइएने म्हटले, ‘भारताने या न्यायालयाचे कायदेशीर अस्तित्व कधीही मान्य केलेले नाही. या न्यायालयाची स्थापना हीच सिंधू जल कराराचे मोठे उल्लंघन असल्याचे भारताचे मत आहे. त्यामुळे भारत ना कधी या न्यायालयासमोर हजर झाला आहे, ना त्याच्या कोणत्याही निर्णयाची दखल घेतली आहे.’ (Indus Water Treaty)


परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, या न्यायालयाला भारताच्या सार्वभौम निर्णयांवर भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. एमइएने म्हटले, ‘या न्यायालयाच्या सध्याच्या किंवा भविष्यातील कोणत्याही निर्णयाचा भारताच्या प्रकल्पांवर कोणताही परिणाम होणार नाही. सीओएच्या कोणत्याही आदेशाचा भारताच्या जलप्रकल्पांवर परिणाम होणार नाही. सिंधू जल करार सध्या स्थगित ठेवण्याचा भारत सरकारचा निर्णय पूर्णपणे लागू राहील.’ (Indus Water Treaty)



कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन (सीओए)ने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सिंधू जल करार पूर्णपणे लागू आहे आणि भारताने त्याअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे. भारताने करार स्थगित ठेवण्यामागे दिलेल्या कारणांचा न्यायालयाने आढावा घेतला असून, करार निलंबित किंवा समाप्त करण्यासाठी ही कारणे योग्य नसल्याचा दावा सीओएने केला आहे.22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जम्मू-काश्मीरमधील सिंधू नदी प्रणालीवर किशनगंगा आणि रातले जलविद्युत प्रकल्पांचे काम सुरू आहे. (Indus Water Treaty)

Comments
Add Comment

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर