Diet Tips : Weight Loss साठी तांदूळ खावा की गहू ?

Weight Loss करायचा आहे ? मग काय उत्तम भाकरी, भात की चपाती ? वजन कमी करायला काय करावं ? असा प्रश्न अनेकांना पडतो.


वजन कमी करायचंय म्हणून बरेच जण भात बंद करतात आणि फक्त चपाती (पोळी) खातात. पण हे बरोबर आहे का? भात आणि चपाती दोन्हीत कार्बोहायड्रेट (कर्बोदके) आहेत. फरक फक्त किती आणि कसे खातो यात आहे.



भारतात भात आणि चपाती हे दोन्ही पदार्थ रोजच्या जेवणात खाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. वजन कमी करण्यासाठी भात आणि चपाती यापैकी काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी मतमतांतरे आहेत. कारण तांदुळाचा भात पटकन पचतो, पोट हलकं राहतं, पण जास्त खाल्ला तर calories वाढतात. याच कारणामुळे ब्राऊन राईस किंवा कमी प्रमाणात पांढरा भात खावा असे आहारतज्ज्ञ सांगतात. चपाती अर्थात गव्हाच्या पोळीत Fiber जास्त असतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. गहू + मल्टीग्रेन चपाती weight loss साठी चांगला option पण तेल-तूप लावून 4-5 चपाती खाल्ल्या तर फायदा होणार नाही, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.



भात किंवा चपाती कोणताही पदार्थ पूर्ण बंद करू नका. प्रमाण नियंत्रित ठेवा. आठवड्यातून 3-4 वेळा एका वाटी भात + भरपूर भाजी/डाळ घेऊ शकता आणि चपाती खाताना दोन पेक्षा जास्त नको. यासोबतच डाळी, कडधान्य, भाजी आणि सॅलड यांचाही रोजच्या आहारात समावेश करावा; असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.



दुपारचं जेवण कसं असावं ?


वजन कमी करायचं असल्यास दुपारच्या जेवणामध्ये भाजी, सॅलड आणि प्रोटीन असणे आवश्यक आहे. प्रोटीनमध्ये तुम्ही डाळी कडधान्य यांचा समावेश करू शकता किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन यांचा सुद्धा समावेश करू शकता, असे आहारतज्ज्ञ सुचवतात. जेवणाचं ताट असं असेल तर तुमचं वजन कमी राहील तसेच आरोग्य देखील उत्तम राहील. योग्य प्रमाणात आहार घेतल्यास पोळी आणि भातानेही वजन वाढणार नाही. तुम्ही आहारातून भात आणि पोळी पूर्णपणे कमी केल्यास चिडचिड होणे, मूड स्विंग होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भात आणि पोळी आहारातून पूर्णपणे बंद करू नये. जेवताना शांतपणे प्रत्येक घास व्यवस्थित चावून खावा. टीव्ही वा मोबाईल बघत जेवण घेणे टाळावे.

Comments
Add Comment

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.