TRAI's MAJOR MOVE : रस्ते अपघातांना ब्रेक लावण्यासाठी 'ट्राय'चा मोठा निर्णय; काय आहे अत्याधुनिक 'V2X' तंत्रज्ञान?

नवी दिल्ली: भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे जाणवणारी जीवितहानी ही एक अत्यंत गंभीर चिंता बनली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच 'ट्राय' (TRAI) द्वारे विकसित केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक 'V2X' (Vehicle-to-Everything) तंत्रज्ञानामुळे येत्या काळात भारतीय रस्ते अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळणार आहे. या तंत्रज्ञानाबाबत अलीकडेच एका उच्चस्तरीय सल्लापत्रावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती.




भारतातील रस्ते अपघातांची भीषण आकडेवारी


सरकारी आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी अंदाजे ४ लाख ८० हजार रस्ते अपघात होतात. या भीषण अपघातांमध्ये तब्बल १ लाख ७० हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो, तर ४ लाख ६० हजारांहून अधिक नागरिक गंभीर जखमी होतात. भारतातील बहुतांश रस्ते अपघातांचे मुख्य कारण म्हणजे वाहनांचा अतिवेग आणि बेदरकारपणे वाहन चालवणे. या जीवघेण्या समस्येवर प्रभावी उपाय शोधण्यासाठीच 'ट्राय'ने V2X तंत्रज्ञानाचा पर्याय पुढे आणला आहे.




V2X तंत्रज्ञान म्हणजे नेमके काय?


V2X म्हणजे 'व्हेईकल टू एव्हरीथिंग' (Vehicle-to-Everything) तंत्रज्ञान होय. हे एक असे क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे, जे वाहनांना त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक महत्त्वाच्या घटकाशी जोडते आणि आपापसात संवाद साधण्याची परवानगी देते. यादरम्यान प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी रिअल-टाइम माहिती पुरवली जाते.




या तंत्रज्ञानाचे प्रामुख्याने चार भाग पडतात:



  1. वाहन ते वाहन (V2V): याद्वारे दोन वाहने कमी पल्ल्याच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून एकमेकांशी संवाद साधतात. दोन्ही वाहने जवळ असताना संभाव्य टक्कर टाळण्यास यामुळे मदत होते.

  2. वाहन ते वाहतूक सिग्नल (V2I): याच्या माध्यमातून वाहने वाहतूक सिग्नल, स्पीड ब्रेकर आणि रस्त्यावरील साइन बोर्ड यांसारख्या पायाभूत सुविधांशी जोडली जातात.

  3. वाहनाकडून पादचाऱ्याला (V2P): रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांशी हे तंत्रज्ञान संवाद साधते. पुढे एखादा पादचारी रस्ता ओलांडत असल्यास, अपघात टाळण्यासाठी वाहन आपोआप ब्रेककस करू शकते.

  4. वाहन-ते-मोबाइल नेटवर्क (V2N): यामुळे वाहने मोबाईल टॉवर्सशी संवाद साधतात, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित सूचना देणे, नकाशे अपडेट करणे आणि क्लाउड सेवांचा लाभ घेणे शक्य होते.




हे तंत्रज्ञान कसे काम करते आणि त्याचे फायदे काय?


वाहनांमध्ये उपलब्ध असणारे सेल्युलर, वाय-फाय आणि शॉर्ट-रेंज रेडिओ फ्रिक्वेन्सी यांसारखे वायरलेस कम्युनिकेशन प्रोटोकॉल वापरून हे तंत्रज्ञान कार्य करते. अमेरिकेत गुगलच्या 'वेमो' सारख्या स्वायत्त (Autonomous) गाड्यांमध्ये या तंत्रज्ञाचा यशस्वी वापर केला जात आहे.


या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. यामध्ये वाहतूक कोंडीची माहिती आगाऊ मिळणे, रस्ता बंद असल्याची पूर्वसूचना मिळणे आणि हिवाळ्यात किंवा दाट धुक्यात पुढील वाहनांची अचूक माहिती मिळणे शक्य होईल. तसेच, पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यास मागच्या वाहनाला तातडीने सावध केले जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एखादी रुग्णवाहिका जवळ येत असल्यास मार्ग मोकळा करण्याचा इशारा या तंत्रज्ञानामुळे चालकाला मिळेल, ज्यामुळे अनेक जीव वाचवणे शक्य होईल. भारतीय रस्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे.

Comments
Add Comment

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

NCP Core Committee Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची देवगिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बांधणीवर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच