Virat Kohli : अनुष्का आणि विराट कोहली यांनी खरेदी केले १८.२९ कोटींचे घर ; घराच्या बालकनीतून दिसते समुद्राचे दृश्य

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सर्वांच्या लाडक्या जोडीने देशभरात अनेक आलिशान मालमत्ता खरेदी केल्या आहेत आणि आता या यादीत आणखी एका भव्य जागेची भर पडली आहे.यांनी मुंबईतील वर्सोवा परिसरात १८.२९ कोटी रुपयांना समुद्राभिमुख घर खरेदी केले आहे. या नवीन गुंतवणुकीमुळे त्यांच्या महागड्या मालमत्तांबद्दलच्या चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत.


झॅपकीने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, या स्टार जोडप्याने गोदरेज स्कायशोर प्रकल्पात १८.२९ कोटी रुपयांना २,६४४ चौरस फुटांचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा फ्लॅट अंधेरी पश्चिमच्या वर्सोवा भागातील प्रीमियम प्रकल्पाच्या वरच्या मजल्यावर आहे. यासोबतच तीन गाड्यांसाठी पार्किंग आणि ३१६ चौरस फुटांची अतिरिक्त खासगी जागाही आहे.



अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मालमत्तेची नोंदणी २१ जुलै, २०२६ रोजी झाली. त्यांनी ३०,००० रुपये नोंदणी शुल्क आणि १.०९ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. यानुसार, प्रति चौरस फूट फ्लॅटची किंमत अंदाजे ६९,१५९ रुपये होते, जे मुंबईच्या उच्चभ्रू भागांमधील आलिशान घरांची वाढती मागणी दर्शवते.


२,१५३ चौरस फुटांचे हे अपार्टमेंट अंदाजे १० कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र, ही अनुष्का आणि विराटची पहिली महागडी मालमत्ता नाही. गेल्या काही वर्षांत, त्यांनी देशभरातील विविध शहरांमध्ये अनेक आलिशान घरे आणि जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्या गुंतवणुकीच्या यादीत अनेक आलिशान प्रकल्पांचा समावेश आहे.


इतर खासगी मालमत्ता :


डीएलएफ फेज-१, गुरुग्राम येथे सुमारे १०,००० चौरस फुटांचा एक आलिशान बंगला:
मुंबई व्यतिरिक्त, विराट कोहलीच्या मालकीचा गुरुग्राममधील डीएलएफ फेज १ मध्ये १०,००० चौरस फुटांचा एक भव्य बंगला देखील आहे. या घरात एक खाजगी स्विमिंग पूल, एक आधुनिक जिम आणि अनेक आलिशान सुविधा आहेत. त्याचे अंदाजित मूल्य सुमारे ८० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.


अलिबागजवळ ८ एकर जमिनीवर बांधलेला एक आलिशान व्हिला:
अलिबागच्या जिराड गावातील आवास बीचजवळ सुमारे ३७.८६ कोटी रुपयांना पाच एकरहून अधिक जमीन खरेदी केली. यापूर्वी २०२२ मध्ये, त्यांनी अलिबागमध्ये सुमारे १९ कोटी रुपयांना आठ एकर जमीन खरेदी केली होती, जिथे त्यांनी नंतर एक आलिशान व्हिला बांधला. या व्हिलामध्ये तापमान-नियंत्रित स्विमिंग पूल, मॉड्युलर किचन, चार स्नानगृहे, जकूझी, एक सुंदर बाग, झाकलेली पार्किंग आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने आहेत.



अनुष्काआणि विराट यांचे लग्न :


अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी २०१७ मध्ये इटलीमध्ये केवळ कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खाजगी समारंभात लग्न केले. या जोडप्याची पहिली भेट २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती.


भविष्यात लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार :
या जोडप्याला वामिका नावाची मुलगी आणि अकाय नावाचा मुलगा अशी दोन मुले आहेत. ते भविष्यात आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत आहेत, तसेच अनुष्का शर्मा अलीकडेच नेटफ्लिक्सच्या 'काला' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. ती या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही सहभागी होती.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी