CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याच्या धोरणात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. या नव्या निर्णयानुसार, विविध राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च २०२७ पर्यंत दोषारोपपत्रे (चार्जशीट्स) दाखल होतील, ते सर्व खटले कायदेशीर तरतुदींनुसार मागे घेतले जाणार आहेत. गृह विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. (CJP)



यापूर्वी शासनाने २१ जुलै २०२६ रोजी काढलेल्या जीआरनुसार, ३१ जुलै २०२६ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले खटलेच मागे घेण्यास मंजुरी होती. मात्र, न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या लक्षात घेता, ही मुदत वाढवण्याची मागणी होत होती. अखेर शासनाने ही मुदत दीड वर्षांनी वाढवून ३१ मार्च २०२७ पर्यंत केली आहे.


या सुधारित निर्णयामुळे हजारो राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या मोर्चांमधील तरुण आणि विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. त्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य धोक्यात येऊ नये, हा संवेदनशील दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक तरुण, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवरील कायदेशीर तणाव दूर होणार आहे. (Jantar Mantar)

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.