Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील 288 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांची शोधाशोध सुरू आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील (Nashik) पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडू (Kathmandu) येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.



11 पर्यटक काठमांडूत अडकले


पेठ तालुक्यातील 11 पर्यटक काठमांडू येथे अडकले असून हे सर्व पर्यटक पेठ नगरपंचायत हद्दीतील आहे. सध्या ते सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून (District Disaster Management Department) देण्यात आली आहे. पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या या ११ जणांचा नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क झाला असून, त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे. अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही केली जात आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये अर्जुन गणपत शिंदे, रोहित चंद्रकांत शिंदे, विशाल जालिंदर शिंदे, रुपेश मुकुंद घोंगे, अभिषेक राजेंद्र पवार, आकाश कृष्णा कोतुळकर, ओम राजेंद्र शिंदे, पीयूष विजय शिंदे, आयुष सोमनाथ शिंदे, करण शिवाजी शिंदे आणि शुभम भोलेनाथ शिंदे यांचा समावेश आहे.



37 भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू


कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा इथं अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांचा काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर आणि महाराष्ट्र सरकारच्या भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी केलेल्या समन्वयानंतर भाविकांना पुढील प्रवासासाठी मार्ग मोकळा झाला. आज सकाळी 6 वाजता सर्व भाविक सागा इथून न्यालम चेक पोस्टच्या मार्गाने काठमांडूकडे रवाना झाले आहेत.



पुराचा धोका कायम


दरम्यान, नेपाळमधील पुरात आतापर्यंत 350 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. यानंतरही नेपाळमधील महापुराचं संकट कायम आहे. नेपाळमधील भोते कोशी नदी परिसरात आता पुराचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळ-चीन सीमेवर नदीचा प्रवाह अडला आहे. त्यामुळे या भागात मोठा तलाव तयार झाला आहे. हा तलाव फुटल्यास पुन्हा पाण्याचा लोंढा येऊ शकतो. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवानविभागाला चीनने धोक्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर छोछेन खोला आणि पुरेपु त्सांग्पो नद्यांच्या संगमाजवळही तलाव तयार झालाय. नदीचा प्रवाह अडल्याने तयार झालेला तलाव कधीही फुटण्याची शक्यता आहे, अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या