Jaykumar Rawal : बाजार समित्यांमध्ये रोजगाराच्या नव्या वाटा; शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनवण्याचा सरकारचा निर्धार

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्या आता केवळ शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे केंद्र न राहता रोजगारनिर्मिती, व्यापारवृद्धी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी केंद्रे म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. (Jaykumar Rawal)


राज्यात २९ सप्टेंबर २०२६ रोजी एकाच दिवशी १ हजार ठिकाणी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार असून, युवकांना रोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (Jaykumar Rawal)



कृषी क्षेत्रातून रोजगाराच्या मोठ्या संधी


अन्नप्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, विपणन आणि निर्यात या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. महाराष्ट्राचा शेतमाल देशभर तसेच जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सक्षम प्रक्रिया आणि पुरवठा व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे रावल यांनी सांगितले. (Jaykumar Rawal)


रोजगार महाकुंभासाठी बाजार समित्यांनी उद्योग व रोजगारदात्यांना सहभागी करून घ्यावे, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि रोजगाराच्या संधींची व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.



कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही बाजार समित्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. (Jaykumar Rawal)


“कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे केवळ मालाची खरेदी-विक्रीची जागा नाही, तर ती रोजगार आणि व्यापाराचे मोठे केंद्र आहे,” असे जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले. (Jaykumar Rawal)

Comments
Add Comment

Hanuman Ansh : २ कोटींच्या बजेटमध्ये बनला, कमावले तब्बल २८० कोटी! ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर चमत्कारी कामगिरी; सुबोध भावेचा बायोपिक ठरला फ्लॉप?

मुंबई : नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित यश मिळवत सर्वांचे

Mumbai Municipal Corporation : कंत्राट कामांंचे पैसे रोखले, १३ कोटींच्या तुलनेत ६६ कोटी रुपये देण्याची आली वेळ

खाते गोठवण्याचा न्यायालयाच्या भीतीने प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने केला मंजूर महापालिकेच्या मलनि:सारण

BMC : मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी ७६ वाहने तैनात

फेरीवाल्यांसह अतिक्रमण मुक्त पदपथ मोहिमेला आणि अधिक बळकटी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने

Modak Mahotsav 2026 : एफडीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा मोदक महोत्सव

महिला बचत गटांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागांतर्गत

Amruta Fadnavis : गणरायाच्या दर्शनासाठी अमृता फडणवीस महापौर निवासस्थानी; तावडे कुटुंबीयांकडून स्वागत

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी १५

Food- Drug Administration Action: अन्न- औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई, मुंबई- पुण्यातील अनेक अस्थापनांची परवाने निलंबित

मुंबई: ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अन्न- औषध प्रशासनाने मुंबई आणि पुण्यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई