Ashok Kharat Bail : भोंदू अशोक खरातच्या जामिनावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 'या' दिवशी होणार

Ashok Kharat Bail : दैवी शक्तीचा दावा करत महिला भाविकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. बुधवारी (दि. 16) न्यायालयात या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता 30 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तोपर्यंत खरातचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे.



उज्ज्वल निकमांकडून जामिनाला विरोध


या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांनी न्यायालयात स्वतः हजर राहत खरातच्या जामीन अर्जाला विरोध केला. खरातविरोधातील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा तपासात अडथळा निर्माण करू शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी खरातच्या बाजूने वकील उपस्थित नसल्याने बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडली जाऊ शकली नव्हती. आता 16 सप्टेंबरची सुनावणीही होऊ न शकल्याने जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.



खरातविरोधात आठ गुन्हे दाखल


खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर ग्रामीण पोलिस ठाण्यांमध्ये बलात्कार, फसवणूक, अवैध सावकारी आणि मनी लाँड्रिंगसह गंभीर कलमांखाली एकूण आठ गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने तपास केलेल्या आठ प्रकरणांपैकी सहा प्रकरणांचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.



कोणत्या प्रकरणात जामीन अर्ज ?


सध्या खरातने सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) दाखल असलेल्या एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. खरातविरोधातील विविध प्रकरणांचा तपास आणि न्यायालयात दाखल झालेली दोषारोपपत्रे या पार्श्वभूमीवर आता 30 सप्टेंबरच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. त्या दिवशी सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि बचाव पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय खरातच्या जामीन अर्जावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Water Shortage: राज्यावर ‘पाणीटंचाई’चे सावट, टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

मुंबई: राज्यातील अनेक भागांत सप्टेंबरचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने

Ganeshotsav 2026 : “स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार - आपले सफाई कर्मचारी!”

सफाई कर्मचाऱ्यांना पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अनोखी मानवंदना! कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची

Nashik : जि. प. ‘नाशिक ते नासा’, १५ हजार विद्यार्थ्यांतून निवडणार १०५ ‘ज्ञानयात्री’; नासा,इस्त्रो अन् संसद भवनाचा प्रत्यक्ष अनुभव

Nashik : जिल्हा परिषद नाशिकच्या ‘मिशन स्कॉलरशिप’ अंतर्गत ‘ज्ञानयात्री’ हा अभिनव शैक्षणिक सहल उपक्रम राबविण्यात

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

मुंबई : बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) एक दुःखद बातमी समोर आली आहे. २०१६

Karjat- Panvel Railway Route: २९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल मार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण, केव्हापासून मार्ग रेल्वे धावणार?

नवी मुंबई: कर्जत- पनवेलकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. कर्जतकरांना नवी मुंबईसाठी जाण्यासाठी मारावा

Djokovic comeback : नोव्हाक जोकोविच ११ वर्षांनंतर चायना ओपनमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज; बीजिंगमध्ये खेळणार स्पर्धा

बीजिंग : टेनिस जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्बियन दिग्गज टेनिसपटू आणि २४ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक