कोल्हापूर शहरात बांधलेल्या रस्त्यांसाठी टोल देण्यास विरोध करणा-या कोल्हापूरकरांच्या लढयाला यश येण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर शहरात खासगीकरणाच्या माध्यमातून ५२ किलोमीटरचे रस्ते आयडियल रोड बिल्डर (आयआरबी) कंपनीने बांधले. यासाठी २२० कोटी रुपये खर्च आला. हा खर्च ३० वर्षे टोल लावून वसूल केला जाणार होता. या विरोधात कोल्हापूरच्या नागरिकांनी सातत्याने जोरदार आंदोलन छेडले. सध्या या टोलविरोधासाठी आमरण उपोषण सुरू आहे.
आयआरबी कंपनीचा झालेला रस्ते बांधणीचा खर्च कोल्हापूर महापालिका देणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
tol la dila tola