Home ताज्या घडामोडी खाजगी शाळांच्या मनमानी फी वाढीला सरकारचा चाप

खाजगी शाळांच्या मनमानी फी वाढीला सरकारचा चाप

1

शाळेतील २५ टक्के पालकांनी तक्रार केली तर शुल्क नियंत्रण समिती (एफआरसी) या संदर्भात योग्य निर्णय येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवार विधानसभेत दिली.

मुंबई- खासगी शाळांकडून भरमसाठ फी आकारणी करण्यात येत असल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती व्ही. जी. पळशीकर समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता शाळेतील २५ टक्के पालकांनी तक्रार केली तर शुल्क नियंत्रण समिती (एफआरसी) या संदर्भात योग्य निर्णय येईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवार विधानसभेत दिली.

विधानसभेत अतुल भातखळकर, अस्लम शेख, आदी सदस्यांनी मुंबईतील काही खासगी शाळांमधील पालकांनी फी वाढीविरुध्द केलेल्या आंदोलनासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या व्यापारीकरणास शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा व शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन कायदा लागू करण्यात आला आहे. मुंबईतील काही खासगी शाळांमधील फी वाढीविरुध्द तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित शाळा व्यवस्थापन व पाल्पालकांसमवेत एकत्रित बैठक घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, शैक्षणिक साहित्यांची खरेदी ही शाळेमधून करण्यात पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये, याबाबतच्या सूचना व्यवस्थापनास देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शल्क विनियमन) अधिनियम, २०११ ची अंमलबजावणी १ डिसेंबर, २०१४ पासून संपूर्ण राज्यात करण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाकडून आकारण्यात येणा-या शुल्काबाबत पालकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने सदर अधिनियमाचा अभ्यास करुन अधिनियमात सुधारणा सुचविण्यासाठी मा.उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही.जी.पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे २०१७ च्या शासन निर्णयान्वये समिती स्थापन करण्यात आली. समितीला प्राप्त झालेल्या सूचना / हरकती व समितीसमोर मांडलेल्या सर्व बाबी विचारात घेऊन समितीने अहवाल दिनांक ६ डिसेंबर, २०१७ रोजी सादर केला आहे. या अहवालात केलेल्या शिफारशींबाबत शासनाकडून पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यता येत आहे.

1 COMMENT

  1. काय लॉजिक आहे यात .

    पालकांनी तक्रार केली तरच हे कारवाई करणार ,
    नाही तर शाळा मालकानंला रान मोकळे………….
    सरकार म्हणून शाळा/ कॉलेज मालकानंला काही नियम , कायदे , बंधने टाकणार कि नाही ?????

    प्रत्येक शाळा/ कॉलेज मध्ये डोनेशन च्या नावा खाली पैसे उकळले जातात , तरी सगळे गप्प !!!!!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version