दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची घसरण झाली आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत गिल दोन स्थानांनी घसरला आहे, तर गोलंदाजीच्या क्रमवारीत बुमराह एका स्थानाने खाली आला आहे. दुसरीकडे, देवदत्त पडिक्कल ५४ व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दोन शतके झळकावल्यामुळे त्याच्या क्रमवारीत कमालीची सुधारणा झाली आहे.
Krunal Pandya : भारताच्या टी२० संघातून वगळल्यानंतर कृणाल पांड्या निराश
नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, एका क्रिकेटपटूची सर्वाधिक चर्चा होती. ...
श्रीलंका दौऱ्यावर तीन डावांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावणारा गिल दोन स्थानांनी घसरून नवव्या स्थानावर आला आहे. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सातव्या स्थानासह कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा भारतीय फलंदाज आहे. स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही आणि तो ११ व्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन शतकांसह ३२८ धावा करणारा पडिक्कल पाच स्थानांनी वर चढून ५४ व्या स्थानावर पोहोचला आहे. पडिक्कलने गॉल कसोटीच्या पहिल्या डावात १६७ आणि दुसऱ्या डावात ४४ धावा केल्या होत्या. तर कोलंबो कसोटीत त्याने ११७ धावांची शानदार खेळी केली.
अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराहने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आपले दुसरे स्थान गमावले आहे. तो आता ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि न्यूझीलंडचा मॅट हेन्री यांच्या मागे तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकला होता. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे, पण त्याची उपलब्धता तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून आहे.
3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत
मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ...
भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके झळकावणारा श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा, आपल्या प्रभावी कामगिरीमुळे फलंदाजीच्या क्रमवारीत २९ स्थानांनी वर चढून २५ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. भारताने मालिकेतील पहिला सामना १६५ धावांनी जिंकला, पण श्रीलंकेच्या संघाला दुसरी कसोटी अनिर्णित राखण्यात यश आले.