काटकसरीने वीजवापर करा

मुंबई (प्रतिनिधी) : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी काटकसरीने विजेचा वापर करा, असे आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.


राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यात मागणीच्या तुलनेत ३ हजार मेगावॅट वीजेचे कमतरता जाणवत आहे. ही वीजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे असे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.


महावितरणने सुद्धा त्यांची एकूण वीजेची मागणी १८,१२३ मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी २०,८७० मेगावॅट सायंकाळी पिक डिमांड पूर्ण केले आहे. महानिर्मितीने वीज उत्पादनामध्ये उत्तम समन्वय राखल्याने कोळशाची आवक वाढली. वीज उत्पादन वाढूनसुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा आहे. भुसावळ येथे वीज उत्पादन संच सुरु करण्यात आल्याने वीजेमध्ये अधिकची भर पडणार आहे, असे राऊत म्हणाले.


कोळसा टंचाई असताना देखील भुसावळ येथील २१० मेगावॅट, चंद्रपूर येथील ५०० मेगावॅट, नाशिक येथील २१० मेगवॅट हे संच सध्या बंद आहेत. तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी तीन संच बंद आहेत. एकूण २७ पैकी सात संच बंद आहेत. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची क्षमता ४० लाख मेट्रिक टन आहे. पावसामुळे ती २२ लाख मेट्रिक टन इतकी खाली होती. ती आता २७ लाख मेट्रिक टनापर्यंत आलेली आहे. त्यामुळे कोल इंडियाकडून क्षमतेनुसार कोळशाचा पुरवठा केला जावा यासाठी प्रयत्न करत आहोत, असे नितीन राऊत म्हणाले.

Comments
Add Comment

डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

मुंबई: एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात

Baramati Crime : बारामतीत ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे गावात ३० वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग

Central Railway : तिकीट मिळालं नाही म्हणून चिंता नको! कोकणात जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या ४ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याची घोषणा

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी

महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान राज्य संरक्षित स्मारक, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड