नवी मुंबई निवडणुकीतून प्रकट होणार दोस्ती यारी!

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई मनपा निवडणुकीत दोस्ती यारी प्रकट होणार असल्याचे एकंदरीत निवडणूक प्रक्रियेतून समोर आले आहे.
महानगरपालिकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने बहुस्तरीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामुळे नवी मुंबईत तीन प्रभागांचे एकत्रीकरण करून तीन उमेदवारांचा समूह करून मतदार राजाकडे मतांचा जोगवा मागावा लागणार आहे. हे तीनही उमेदवार एकमेकांना साथ देऊन विजयी होण्यासाठी वाटचाल करणार आहेत.


महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी एक अध्यादेश काढला. त्यामध्ये राज्यात होणाऱ्या विविध नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. यामध्ये तीन सदस्य प्रभाग पद्धती करण्यास अडचणी येत असतील, तर २ किंवा ४ प्रभाग पद्धती अवलंबण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत; परंतु नवी मुंबई मनपात १११ प्रभाग आहेत. त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रभागात तीन सदस्यीय प्रभाग रचनेत एकूण ३७ प्रभाग निर्माण होणार आहेत. निवडणूक आयोगाने काढलेल्या अध्यादेशानुसार व नियमानुसार मनपाची लोकसंख्या व प्रभाग हे तीन सदस्यीय रचनेस योग्य असल्याने नवी मुंबईत तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेतली जाणार आहे.


नवी मुंबईत असलेली महाविकास आघाडी, भाजपमध्ये काटे की टक्कर लढत होणार आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत एक सदस्यीय पद्धत असल्याने अनेक माजी नगरसेवकांची ताकद आपल्या एकाच प्रभागात सीमित राहिली आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जे तीन प्रभाग मिळून एक प्रभाग होणार आहे. त्यातील एका पक्षातील तिन्ही उमेदवारांना एकत्रित येऊन प्रचार करावा लागेल. हेवेदावे विसरावे लागतील. पण, जुना राग उकरून काढल्यास अपयशाचे मानकरी व्हावे लागेल. त्यामुळे निवडणुकीत तरी दोस्तीगिरीला चालना मिळणार असल्याचे दिसून येत आहे.



कुरघोडी ठरणार अपयशाला कारणीभूत....


आजही राजकीय पक्षात हेवेदावे आहेत. जर उमेदवारांनी आपला वाद निवडणुकीच्या रिंगणात काढला, तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्यास कारणीभूत ठरणार आहे. म्हणून एकाच प्रभागात लढताना मैत्रीपूर्ण वाटचाल करावी लागणार आहे.



Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर