पाणीटंचाई विरोधात विरोधी पक्ष आक्रमक

ठाणे (वार्ताहर) : मागील काही दिवसांपासून कळवा-मुंब्रा भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. चार-चार दिवस पाणी नसतानाच दूषित पाण्याचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेले विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दूषित पाण्यासह थेट पालिका आयुक्तांचे दालन गाठून ठिय्या आंदोलन केले.


तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ठाणे शहरासह राज्यभर शाळा सुरु झालेल्या असतानाही प्रत्यक्ष महासभा घेतली जात नाही. ठाणेकरांचे प्रश्न सभागृहात मांडले जाऊ नयेत, यासाठीच प्रत्यक्ष महासभा होत नसल्याचा आरोप करीत ठाणे पालिकेच्या महासभेतच कोरोना येतो का?, असा सवालही यावेळी पठाण यांनी केला.


सध्या एमआयडीसीच्या वतीने जुन्या जलवाहीन्या बदलण्याचे काम सुरू आहे. परंतु ते सुरू असताना वारंवार जलवाहिनी फुटत असल्याने त्याचा परिणाम कळवा, मुंब्य्रातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात पाण्याची समस्या तीव्र स्वरुपात निर्माण झाली आहे. याच पाण्याच्या मुद्यावरून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पाणी पुरवठा सुरळीत केली नाही तर महापालिकेकडे बघावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतरही या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नसल्याचेच दिसून आले आहे.


दरम्यान, पाण्याच्या याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाण्याची टंचाई असलेल्या भागाची पाहणी करुन दुपारी १ वाजता महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. अखेर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची मनधरणी केली. त्यानुसार पाण्याचे प्रेशर वाढविण्याबरोबर येथील टाकीची समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.