सिद्धीस इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम

मुरबाड: मुरबाड मधील सिद्धीस इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी टेक्निकल इन्स्टिटयूटला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला आहे. तब्बल ६ हजार प्रोजेक्ट्समधून त्यांची निवड करण्यात आली. मुंबईमध्ये वरळी एक्सिबिशन सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. बी. एस मार्शल फाउंडेशनचे संस्थापक बलदेवकृष्ण शर्मा, न्यूक्लियर सायंटिस्ट डॉ. अ. प. जयरामन, रोटरी क्लब वरळीचे अध्यक्ष. सचिन संघवी व आयसीटीचे माजी कुलगुरू जे. बी. जोशी, यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.


या महाविद्यालयातील विद्यार्थी प्राजक्ता गावडे, मानसी शेळके, राहुल विश्वकर्मा व पियुष यादव यांनी हा प्रोजेक्ट तयार केला होता. प्रथम पारितोषिक म्हणून सर्टिफिकेट, सन्मानचिन्ह व रुपये १ लाखाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीकांत काकडे प्रा. मोहित जाधव उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे बापूसाहेब देशमुख सेवा प्रतिष्ठानचे चेअरमन संतोष अनंत देशमुख यांनी कौतुक केले आहे. महाविद्यालयात रिसर्च करणे हि काळाची गरज आहे, व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची क्षमता ओळखुन त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्याचे काम प्राचार्य डॉ. रजनीकांत तु. काकडे सर करत आहेत. तसेच या प्राचार्य शोहेब शेख, प्राचार्य सचिन कोकाटे तसेच इतर सर्व प्राध्यापक वर्गाचेही योगदान लाभले.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; महाराष्ट्राच्या लोककलेचा देश-विदेशात व्यापक जागर

मुंबई : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राची समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि

Mayor's Residence Ganpati : महापौर निवासस्थानी बाप्पाचे भक्तिभावाने आगमन; पालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या कलेचा विशेष सन्मान

मुंबई :

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची हजेरी! हलका-मध्यम पाऊस, वाऱ्याचा जोर; IMDचा शहराला मोठा अलर्ट नाही

मुंबई : गणरायाच्या आगमनाने मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शहरात पावसानेही हजेरी लावली आहे.

Navi Mumbai Crime: टिंडर ॲपवरून मैत्री, बिअर पाजली, हॉटेलला बोलवून... मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई: पुन्हा एकदा मुंबईमध्ये डेटिंग ॲपवरून तरूणींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण

Nitesh Rane News: हिंदू भूमीच्या रक्षणासाठी वराह देवाचे स्मरण आवश्यक, मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

मुंबई: हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी वराह देवाचे स्मरण आणि पूजन आवश्यक

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ