मी सुद्धा जिवंत आहे, आशिष शेलारांनी हाणला शालजोडी टोला

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.


ते म्हणाले, “घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?” अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.



मी सुद्धा जिवंत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न


आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांचे वक्तव्य मी सुद्धा जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न असून त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व देणे गरजचेचे नसल्याचे म्हटले आहे.



संजय राऊतांनी उंची पाहुन बोलावे


संजय राऊत यांच्यावरही आशिष शेलार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले संजय राऊत यांनी उंची पाहुन बोलावे. त्याचबरोबर त्यांनी डोकेसुद्धा चेक करून घ्यावे.

Comments
Add Comment

Ganpati Visarjan 2026: गणपती विसर्जनासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर २२ जादा लोकल फेऱ्या, एका क्लिकवर जाणून घ्या टाईम टेबल

मुंबई: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करून रात्री उशिरापर्यंत घरी परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी मध्य

BMC : मुंबईत वायू प्रदुषणाची भीती, महापालिका यंत्रणा अलर्ट

येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल

Mumbai Ganeshotsav 2026 : गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

तब्बल २५ हजारांहून अधिक अधिकारी,कर्मचाऱ्यांचा फौजफाटा एकूण ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे बुजवले यंदा ‘एक

Kalyan- Kasara Block: कल्याण-कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी पुन्हा ब्लॉकचे संकट; शनिवारी घेणार विशेष ट्रॅफिक ब्लॉक

कल्याण: मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकावर

Jogeshwari Station CCTV Video: 'काळ आला होता पण…', जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील थरार! RPF जवानानी प्रवाशाला दिले जीवनदान

मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या घाई गडबडीमध्ये अपघात होण्याचा प्रकार घडताना आपण पाहिलं असेल.

BMC Guidelines : गणेशोत्सवासाठी बीएमसीची 'कडक' नियमावली! प्रसाद, अग्निसुरक्षा अन् स्वच्छतेबाबत नवे नियम जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026)  पार्श्वभूमीवर भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव