मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आगामी गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026) पार्श्वभूमीवर भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक विशेष नियमावली (गाइडलाइन्स) जाहीर केली आहे. उत्सवादरम्यान परिसर स्वच्छ ठेवणे, आगीपासून सुरक्षेचे उपाय योजणे आणि प्रसादाचे वाटप करताना अन्नसुरक्षेचे कडक नियम पाळण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. मंडळांनी मंडपाचा आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा आणि ध्वनीप्रदूषण टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मंडपाच्या परिसरात कोणताही ज्वलनशील पदार्थ ठेवू नये आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशामक उपकरणे सज्ज ठेवावीत, अशा सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.
निर्माल्यासाठी 'निर्माल्या कलश'चाच वापर करा
प्रसादासाठी अन्नसुरक्षेचे कडक नियम
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसादाचे वाटप करणाऱ्यांसाठी बीएमसीने अन्नसुरक्षेबाबत विशेष नियम लागू केले आहेत. प्रसादाचे तयार करणे आणि वाटप करणे हे सर्व काम 'अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, २००६' आणि २०११ मधील नियमावलीनुसारच झाले पाहिजे. प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्नधान्य, इतर साहित्य आणि फळे फक्त परवानाधारक किंवा नोंदणीकृत व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावेत. कुजलेली किंवा खराब झालेली फळे प्रसादासाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्यच असावे आणि आचारी (कॅटरर्स) कडे आवश्यक परवाना असावा. तसेच ज्या ठिकाणी प्रसाद बनवला जातो तो परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक असणे बंधनकारक आहे.
मुंबई : सणासुदीच्या खरेदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच भारतीय इलेक्ट्रॉनिक्स बाजारावर वाढत्या किमतींचा परिणाम दिसू लागला आहे. ॲमेझॉन इंडियाच्या ...
मावा आणि मिठाईबाबत पालिकेचा इशारा
खोया किंवा माव्यापासून बनवलेल्या मिठाईची खरेदी करताना भाविकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला पालिकेने दिला आहे. मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी मंडपांमध्ये जाऊन तपासणी करतील. गणेश मंडळांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांच्या सूचनांचे पालन करावे. प्रसाद किंवा अन्नाच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास नागरिक बीएमसी वॉर्डातील अन्न सुरक्षा अधिकारी, सहाय्यक आयुक्त (अन्न) किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे थेट संपर्क साधू शकतात.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
बीएमसीने सर्व मुंबईकरांना आणि मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. भाविकांनी शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करावी आणि मूर्ती विसर्जनासाठी पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांचा (Artificial Ponds) वापर करावा. सजावटीसाठी थर्मोकोलऐवजी कागद किंवा इतर नैसर्गिक साहित्याचा वापर करावा आणि पर्यावरणास पूरक असणाऱ्या रंगांचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. बीएमसी आणि मुंबई पोलिसांच्या नियमांचे कडक पालन करणे आवश्यक असून, कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी नागरिक पालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकतात.