‘जेजे’रुग्णालयात नक्की चाललंय काय?



  • निवासी डॉक्टर संपावर, लहानेंना हटवण्याची मागणी




  • डॉ. अशोक आनंद आहेत तरी कोण?




मुंबई : सर जे. जे. रुग्णालयातील नेत्र विभागात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नियम पायदळी तुडवले जात असून वरिष्ठ डॉक्टर मनमानी कारभार करत असल्याची तक्रार करत निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे.


नेत्र विभागप्रमुख आणि डॉ. तात्याराव लहाने यांना या विभागातून दूर करावे, या मागणीसह बेमुदत काळासाठी हा संप पुकारला आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले.


नेत्र विभागातील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी डॉ. लहाने बेकायदेशीरपणे विभाग चालवत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांना सर्जरी शिकविण्यात येत नसून याचा परिणाम त्यांचा दैनंदिन शिक्षणावर होत आहे. वैद्यकीय आयोगाच्या नियमाप्रमाणे या विभागातील पदे भरली गेली पाहिजे. मात्र, तसे या विभागात झालेले नाही, असे मार्डचे म्हणणे आहे.


बुधवारी सायंकाळी पाचनंतर पुकारण्यात आलेल्या संपामुळे रुग्णालयाच्या नियमित कामावर परिणाम झाला असून रुग्ण सेवा कोलमडली आहे.


अशा आहेत मागण्या...


 दोन्ही डॉक्टरांची नेत्र विभागातून तत्काळ बदली करा.
 वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विभागातील पदे भरा.
 पहिल्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांचे तीन महिन्याचे थकीत विद्यावेतन द्यावे.
 तिसऱ्या वर्षातील निवासी डॉक्टरांची थकीत देणी देण्यात यावी.

हे पण वाचा : जे. जे. रुग्णालयातील नेत्रतज्ञ्ज डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे


सर जे जे रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


काही दिवसांपूर्वी नेत्र विभागात पदव्युत्तर शाखेच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने त्रास देत असल्याची तक्रार राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री, सचिव, संचालक आणि जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली आहे.


त्या समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक आनंद यांना केले आहे. काही वर्षांपूर्वी याच डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी पारेख यांनी चौकशी केली होती. तसेच डॉ. आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या अशा व्यक्तीकडून चौकशी करण्याऐवजी समितीचा अध्यक्ष बदलावा, अशी विनंती करण्यात आली होती.


मात्र, अधिष्ठात्यांनी तसे न करता चौकशी सुरू ठेवली. यामुळे आकसबुद्धीने ही चौकशी करत असल्याचे अध्यापकांतर्फे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरात अधिष्ठात्यांनी या विभागासाठी कोणतीही मदत केलेली नाही, असा आरोपही करण्यात आलेला आहे.



त्यांच्या या आहेत मागण्या...



  • या विभागाची रुग्ण सेवा सुरळीत ठेवायची असल्यास अधिष्ठात्यांविरोधात योग्य ती कारवाई करावी.

  • निवासी डॉक्टरांना भडकाविणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करावी तसेच इतर निवासी डॉक्टरांना समज द्यावी.

  • डॉ. रागिणी पारेख यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी. त्याचप्रमाणे सर्व अध्यापकांचे राजीनामा मंजूर करून त्यांना कार्यमुक्त करावे.


दरम्यान, अधिष्ठाता कार्यालयात कोणतेही राजीनामे आलेले नाहीत. डॉ. रागिणी पारेख १५ दिवस रजेवर गेल्याचा त्यांचा अर्ज आला आहे. राजीनाम्याचा अर्ज आलेला नाही. मी कुणाला काय त्रास दिला हे सांगावे. डॉ. लहाने महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त कार्यक्रमांतर्गत काम करत आहेत. ते जे. जे. आस्थापनेवर नसल्याने त्यांच्या जे. जे. मधील राजीनाम्याचा प्रश्न येत नाही, असे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची हजेरी! हलका-मध्यम पाऊस, वाऱ्याचा जोर; IMDचा शहराला मोठा अलर्ट नाही

मुंबई : गणरायाच्या आगमनाने मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच शहरात पावसानेही हजेरी लावली आहे.

Navi Mumbai Crime: टिंडर ॲपवरून मैत्री, बिअर पाजली, हॉटेलला बोलवून... मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई: पुन्हा एकदा मुंबईमध्ये डेटिंग ॲपवरून तरूणींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण

Nitesh Rane News: हिंदू भूमीच्या रक्षणासाठी वराह देवाचे स्मरण आवश्यक, मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

मुंबई: हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी वराह देवाचे स्मरण आणि पूजन आवश्यक

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ

Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!

पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन