उपमुख्यमंत्री पवारांच्या प्रश्नावर चिडले मुख्यमंत्री, फडणवीसांनी घेतली धाव

मुंबई: काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील रुग्णालयात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिखट सवाल केला. मात्र एकनाथ शिंदेंनीही पवार यांनाच त्यांच्याच भाषेत याचे उत्तर दिले. दरम्यान, वादाची ठिणगी पडेल असे दिसताच वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला.


शुक्रवारी झालेल्या मंत्र्यांच्या खासगी बैठकीदरम्यान हे चित्र पाहायला मिळाले. राज्यातील सध्याचे प्रश्न, तसेच नियोजन, त्यावरील उपाययोजना याबाबत मंत्र्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणाचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.


यावेळेस तुमच्या ठाण्यात इतके मृत्यू कसे झाले? घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे. असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. अजित पवारांच्या या प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडले आणि त्यांनी त्याच अंदाजात पवार यांना उत्तर दिले. दरम्यान, त्यांच्या या बोलण्याचे रूपांतर वादात होऊ नये म्हणून वेळीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण तिथेच थांबवले.


जेव्हा अजित पवार यांनी कळवा रुग्णालय मृत्यूप्रकरणी सवाल उपस्थित केला तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्ण गंभीर स्थितीत होते. किती रुग्ण शेवटच्या घटकेला रुग्णालयात आणले गेले? तसेच रुग्णालयावर असलेला तणाव याची सर्व माहिती त्यांनी अजित पवार यांना दिली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, त्यांना समजले की हा विषय अधिक वाढू नये म्हणून त्यांनी लगेचच दुसरा विषय काढत या मुद्द्यावरून साऱ्यांचे लक्ष हटवले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.