Marathwada Rain : मराठवाड्यातील बळीराजाला पिकांना घालावे लागतेय तांब्याने पाणी...

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची दैन्यावस्था


मराठवाडा : पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतर गेल्या महिन्याभरात मात्र पाऊस दडी मारुन बसला आहे. राज्यभरात पावसाच्या गैरहजेरीमुळे शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत. आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस (Rain) झाल्याने किमान पेरण्या झाल्या. मात्र, आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे.


मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांत पीक सुकून चालले आहे. पावसाअभावी शेतकरी अक्षरशः तांब्याने पाणी घेऊन पीकांच्या मुळांशी पाणी घालत आहेत. बळीराजाने प्रेमाने लावलेली त्याची रोपे सुकताना पाहून त्याचा जीव तीळतीळ तुटतोय पण पावसाने पाठ फिरवल्याने आता बळीराजाचं अख्खं कुटुंबच बादली, तांब्या हातात घेऊन रोजच्या वापरासाठीचं पाणी आपल्या बाळांना जगवण्यासाठी वापरत आहे. असंच चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावातही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमुळे बळीराजा चिंतीत झाला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे संकटात सापडला आहे. दरम्यान, यंदा मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली. पण, ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला असल्याने अनेक ठिकाणी २० दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी हाताने पिकांना थेंब-थेंब पाणी टाकत आहे. एकदा पाणी टाकल्यावर झाडाची किमान तीन चार दिवसांसाठी चिंता मिटते. परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहीरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आता पिण्यासाठी देखील अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने झाडांना टाकण्यासाठी तरी पाणी कोठून आणणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.



कोठे किती पाऊस पडला?



  • कोकण विभाग (२८ टक्के पाऊस) : सरासरी ७६६ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात २१७ मिलिमीटर पाऊस झाला.

  • नाशिक विभाग (२० टक्के पाऊस) : सरासरी १९७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४० मिलिमीटर पाऊस झाला.

  • पुणे विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी २४७ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ५४ मिलिमीटर पाऊस झाला.

  • औरंगाबाद विभाग (२२ टक्के पाऊस) : सरासरी १९३ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ४४ मिलिमीटर पाऊस झाला.

  • अमरावती (२९ टक्के पाऊस) : सरासरी २३१ मिलिमीटर पाऊस पडतो, प्रत्यक्षात ६८ मिलिमीटर पाऊस झाला.

  • नागपूर (५५ टक्के पाऊस) : सरासरी ३४७ मिलिमीटर पाऊस पडतो, १९३ प्रत्यक्षात मिलिमीटर पाऊस झाला.


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.