Toll : मुंबईच्या ‘एन्ट्री’ पॉईंटवरील पाचही टोलनाक्यांवर टोल दरवाढ!

मुंबई : मुंबईत प्रवेश करताना मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Toll) वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे.


येत्या १ ऑक्टोबरपासून टोल दरात १२.५० ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे.


हलकी मोटार वाहने किंवा प्रवासी कार यांच्यासाठी एकेरी टोल ५ रुपये वाढणार आहे.


मिनी बससाठी टोल दरात १० रुपये वाढ होणार आहे. मिनी बसचालकांना आधी ६५ ते ७५ रुपये द्यावे लागत होते.


ट्रक आणि बससाठी १५० रुपये तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.


या एन्ट्री पॉइंट्सवर सन २००२ पासून टोल घेतला जात आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये टोलदरात सुधारणा करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा टोलदरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील सुधारीत दरवाढ ऑक्टोबर २०२६ मध्ये होईल.


दरम्यान, २०२६ नंतर दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड आणि ऐरोली खाडी पूल येथे टोल आकारणी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे टोल बंद झाले तरी ठाणे खाडी पुलाच्या बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी येथे टोल सुरू राहिल अशी शक्यता आहे.


एमएमआर भागातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च वसुलीसाठी २००२ ते २०२७ या २५ वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार ही वाढ झाली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव