Health Tips: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करावी की थंड? घ्या जाणून

मुंबई: उत्तर भारतात थंडीचा(cold) मौसम सुरू झाला आहे. सातत्याने तापमानात घसरण होत आहे. पुढील २-३ आठवड्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. अशातच लोक निरोगी(healthy) राहण्यासाठी काळजी घेत असतात. थंडीत लोक गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याला पसंती देतात. दरम्यान, अनेकजण कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात.


दरम्यान, आपल्या आरोग्यासाठी गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले असते की थंड पाण्याने हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आयुर्वेदात थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले असते. आंघोळीसाठी पाणी जास्त गरम असता कामा नये.


थंडीच्या दिवसांत कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो. शरीरही मोकळे होण्यास मदत होते. या पाण्याने शरीराची चांगली स्वच्छता होते. तसेच सर्दीपासून आराम मिळतो. दरम्यान, त्वचेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी गरम पाण्याने आंघोळ करू नये.


दरम्यान, थंड पाण्याने आंघोळ करण्याने काही नुकसान होत नाही. कोणत्याही मोसमात थंड पाण्याने आंघोळ केली जाऊ शकते. दरम्यान, रात्रभर भरून ठेवलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. दरम्यान ताज्या पाण्याने आंघोळ केल्यास इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.


ज्या लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास आहे तसेच ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत आहे त्यांनी ताज्या पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.