Devendra Fadanvis : सगळ्याच गोष्टींना उद्धव ठाकरेंचा विरोध का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल


नागपूर : सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे उठसूठ सगळ्याच गोष्टींना विरोध करत आहेत. मुंबईत मेट्रो कारशेडला विरोध केला. तर तिकडे कोकणात नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनीच पत्राद्वारे सरकारला सुचवली. मुंबईत धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदा देखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेच रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. मात्र या निविदेतील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारनेच तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत. असे असतानाही उद्धव ठाकरेंचा विरोध का? सगळ्याच बाबतीत ते विरोध करताना दिसतात. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप करत मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार पलटवार केला.


धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत. गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, ते तिथेच खितपत पडून रहावे, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजीटल पद्धतीने करावी लागणार हा बदल आम्ही केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी