हातात पुस्तक घेतल्यावर झोप येते तर जरूर ट्राय करा या टिप्स, कधीच येणार नाही सुस्ती

मुंबई: अभ्यास करता अनेकदा पुस्तके हातात घेतल्यावर तुमच्या मुलालाही झोप(sleep) येते का? मुलांमध्येच नाही तर मोठ्यांमध्येही ही समस्या पाहायला मिळते. अनेकदा पुस्तक वाचायचे असते मात्र ते हातात घेतल्यावर झोप येते. तुम्हालाही असेच होत असेल तर जरूर ट्राय करा खाली दिलेल्या टिप्स...



पुस्तके हातात घेताच का येते झोप


जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा डोळ्यांशी संबंधित स्नायूंवर ताण येतो. आपला मेंदू वाचलेल्या गोष्टी आठवून त्या एकत्रित साठवण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा डोळ्यांचे स्नायू थकतात अथवा मंद गतीने काम करतात तेव्हा झोप येऊ लागते. अनेकदा अभ्यास करताना आपली बसण्याची स्थिती चुकीची असल्यास झोप येऊ शकते. येथेही तसेच होते आपण बस अथवा ट्रेनमध्येही बसल्या बसल्या झोपतो. त्यामुळे अभ्यासादरम्यान बॉडीचे पोस्चर अशा पद्धतीने ठेवा की ज्यामुळे खूप आरामदायक वाटणार नाही. तसेच त्यामुळे सुस्तीही येणार नाही.



अंधारात अभ्यास करू नका


जेव्हा तुम्हीही अभ्यासाला बसाल तेव्हा अशी जागा निवडा येथे पुरेसा उजेड असेल. यामुळे डोळ्यांवर कमी ताण येईल आणि सुस्ती जाणवणार नाही.



खुल्या जागेत अभ्यास करा


खुल्या जागा जसे छत, बाल्करनीमध्ये हवा आणि उजेड चांगला असतो यामुळे अशा ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. यामुळे कमी सुस्ती येईल. तसेच झोपही येणार नाही.



अंथरूणावर झोपून अभ्यास करू नका


काही जणांना अंथरूणावर बसून अभ्यास करण्याची सवय असते. असे केल्याने आळस आणि सुस्ती जाणवते. यामुळे अभ्यासात मन लागत नाही. त्यामुळे अभ्यास करताना टेबल-खुर्चीवर बसून करा.



अभ्यासाआधी हलके जेवण घ्या


अधिक आणि झोप येणे स्वाभाविक आहे. अशातच जेवण जेवल्यानंतर लगेचच अभ्यासाला बसू नका. हलके आणि पचेल असे जेवण घ्या. खाल्ल्याने सुस्ती येणार नाही.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर