रोटी, कपडा व मकान देणारा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया


मुंबई : आत्मनिर्भर व बलशाली भारताचा पाया घालणारा आणि विकसनशील भारत ते विकसित भारत अशी वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली. हा केंद्रीय अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील १० वर्षांच्या प्रयत्नांचे फलित असून देशाला महासत्ता बनवण्याच्या आणि देशाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. खऱ्या अर्थाने रोटी, कपडा व मकान या सुविधा जनतेला पुरवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


सर्वसमावेशक, सर्वसामान्यांना न्याय देणारा, महिला, तरुण, अबालवृद्ध, शेतकरी, कामगार या सर्वांचा विचार करून तयार करण्यात आलेला व त्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर रचनेत बदल न केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मागील दहा वर्षांमध्ये आणलेल्या योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय, गोदामांची अधिकाधिक व्यवस्था, आत्मनिर्भर तेलबिया अभियान, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच स्वत:च्या पायावर उभे राहता येईल असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पामध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आलेले आहे. अंगणवाडी सेविकांना (आशा सेविकांना) आयुष्यान भारतचे कवच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना त्यांनी या अर्थसंकल्पात आणल्या आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे वृद्धीकरण करून २ कोटी घरे देण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने रोटी, कपडा व मकान या सुविधा जनतेला पुरवणारा हा अर्थसंकल्प आहे. स्किल डेव्हलपमेंटला प्राधान्य देताना तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ५० वर्षांत परतफेड करता येईल अशी बिनव्याजी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, त्यासाठी १ लाख कोटींची तरतूद केली आहे. आयआयटी, आयआयएममध्ये वाढ होणार असल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांना लाभ मिळेल. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, घरांवरील सोलर पॅनल्सच्या माध्यमातून १ कोटी घरांना महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत पुरविणे या निर्णयांमुळे देशाला विकासाची एक नवी ऊर्जा मिळेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

Ganpati miravnuk accident : छत्रपती संभाजीनगरमधील भीषण अपघात; गणपती मिरवणुकीत कंटेनर घुसल्याने दोन गणेशभक्त ठार, १२ जण जखमी

छत्रपती संभाजीनगर: गणपती बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहात आणि आनंदा वातावरणात सुरू असलेल्या मिरवणुकीत एका भरधाव

Rain Update : विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस ! हवामान खात्याचा 'या' जिल्ह्यांना इशारा

Rain Update : राज्यभरात आज गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळत असताना पावसानं पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

मुंबई: एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात

Baramati Crime : बारामतीत ३० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे गावात ३० वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

ST Bus News: 'एसटी'कडून ५ हजार बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण, ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग