यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार आणि घोटाळे जनतेसमोर आणा - गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पेण(देवा पेरवी) - देशातील लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार चारशे पार अशी घोषणा करत आपल्या पक्षाचे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्याच धर्तीवर आज रायगड लोकसभा मतदार संघातील भाजपचा युथ कार्यकर्ता मेळावा पेण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणुन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात डेव्हलमेंट केली आहे. मात्र मागील दहा वर्षांचा विचार केला तर आत्ताच्या 18 ते 26 या वयोगटातील नव मतदारांना मोदींचे नेतृत्व माहीत आहे. पण यापूर्वी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांचे कारनामे त्यांना माहीत नसतील तर ते बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावेत असे आवाहन केले.


तर भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांना टोला लगावत सांगितले की, आजपर्यत जुन्या कार्यकर्त्यांनी या जिल्ह्यात भाजप जगवली. मात्र आत्ता युतीमध्ये येऊन डायरेक्ट जागेवर हक्क दाखवत असेल तर आम्ही शेती पिकावयाची, आम्ही कापणी, नांगरणी करायची आणि आत्ता आलेले जर शेतावर हक्क दाखवत असतील तर ते आमचे कार्यकर्ते स्वीकारु शकत नाहीत असे सांगितले.


तसेच आमदार रविशेठ पाटील यांनी थेट माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका करत ज्या भाजप सरकार सोबत राहून ज्यांनी पाच पाच वेळा खासदार होऊन, केंद्रात मंत्रीपदे भूषवून सत्ता भोगली त्यांचे या रायगडच्या विकासासाठी योगदान काय आहे? रेल्वे, महामार्ग, बाळगंगा प्रकल्प, कारखानदारी यांसारखे किती प्रश्न दिल्ली दरबारी सोडविले असा सवाल केला.


यावेळी व्यासपीठावर रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे केंद्रातील निरिक्षक तथा गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पेण चे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, दक्षिण रायगड भाजप जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, केलसेकर, भाजपाचे बाळासाहेब पाटील, महेश मोहिते, विक्रांत पाटील, बाळ माने, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि पेण विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यूवा, महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला