MVA : मविआमध्ये अजूनही जागावाटपावरुन धुसफूसच!

काँग्रेस आणि ठाकरे गट दोन जागांवर आग्रही


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा आज जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता (Code of Conduct) लागू होणार आहे. त्यामुळे सर्वांचेच डोळे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दुपारच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहेत. दरम्यान, तारखा जाहीर होण्याची वेळ आली तरी महाविकास आघाडीमधील (MVA) जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभेसाठी सर्व राजकीय पक्ष (Political Parties) कंबर कसून तयारी करत आहेत. मात्र, आता निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या असातानाही मविआमध्ये जागावाटपावरुन धुसफूसच सुरु आहे.


मविआचे काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दोन जागांवर आग्रही आहेत. सांगली (Sangli) आणि रामेटक (Ramtek) या दोन जागांवरील तिढा कायम आहे. या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. या जागांवरती काल चर्चा झाली होती, मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी