Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक विद्यार्थी, महिला आणि बालकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावी, असे आवाहन शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. ( Bhatke Vimukta Samaj)


महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटर सभागृहात राज्यस्तरीय ‘भटके-विमुक्त दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक अडचणींसोबतच लिंगभेदाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांच्या शिक्षणासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी, सुरक्षिततेसाठी आणि कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे.



उपजीविकेसाठी विविध ठिकाणी फिरून वस्तूंची विक्री करणाऱ्या नागरिकांकडे संशयाने पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना सन्मानाने आणि समान संधीने जगता आले पाहिजे. समाजातील अनेक विद्यार्थी आणि बालके अजूनही सरकारी योजनांच्या लाभापासून दूर आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची विभागनिहाय माहिती घेऊन कोणताही घटक योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी म्हटले. ( Government Schemes)


भटके-विमुक्त समाजाची पारंपरिक वेशभूषा, बोलीभाषा, कला आणि लोकसंस्कृती ही त्यांची महत्त्वाची ओळख आहे. या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासोबतच नव्या पिढीने शिक्षणाला प्राधान्य देऊन मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.


शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास अधिक नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल. समाजाच्या विकासासाठी शासन आणि संबंधित विभागाला आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाहीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.


कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, भटके-विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ( Women Empowerment)


Comments
Add Comment

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि