ठाण्यातील कामगारांना वाली कोण? २ महिन्याच्या उपोषणानंतरही परिस्थिती जैसे थे!

ठाणे (वार्ताहर) : ठाणे येथील तीन हातनाका परिसरातील सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांनी ११ मार्चपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जुलै २०२२ पासून ते मार्चपर्यंत थकित पगार न मिळाल्याने सुपर मॅक्स कंपनीचे कामगार आक्रमक झाले आहेत. सुपर मॅक्स कंपनी बंद पडून जवळपास दीड वर्ष झाले. त्यामुळे कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या नोकऱ्या जाऊन अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.


अशात कंपनीने कामगारांचे थकवलेले पगार कामगारांना द्यावेत या मागणीसाठी कंपनी बाहेर तब्बल १२०० कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या कंपनीचे काही कामगार निवृत्त झाले आहेत, काही आजारी तर काही कामगार हयात नाहीत. कामगारांना अर्धा पगार देण्याचे आश्वासन असुनही त्यांना अजून पगार मिळालेला नाही. आक्रमक कामगारांनी ११ मार्चपासुन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. पण तरीही कंपनी प्रशासनाकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्याचा कोणताही पाठपुरावा झालेला नाही.


तब्बल २ महिने साखळी उपोषण करुनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कामगार  म्हणतात की "कामगार दिनानिमित्त आनंद व्यक्त करावा की रोजगारासाठी कराव्या लागणाऱ्या वणवणीचं दु:ख व्यक्त करावं? हेच समजत नाही."

Comments
Add Comment

Mumbai Metro : गणेशोत्सवासाठी मुंबई मेट्रो सज्ज; १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत वाढीव सेवा उपलब्ध

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे.

Ganeshotsav : मूर्तिच्या आकारापेक्षा भक्ती महत्वाची

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळा अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंहासंघाचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डी. जे ला

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३८६ गणपती विशेष गाड्या जाहीर, कोकणासाठी ४ अतिरिक्त गाड्यांची भर

मुंबई :

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख

Mumbai Accident News : शिवडी वर्कशॉपमध्ये भीषण अपघात; SUVच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू

मुंबई : शिवडीतील ‘कोलगेट जेटी’ परिसरातील एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये एसयूव्हीच्या धडकेत ३२ वर्षीय कामगाराचा

Devendra Fadnavis : छत्रपतींचे अनुयायी हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत! मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत धडकण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनासाठी येण्याचा