Devendra Fadnavis : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? सत्य बाहेर आले तर बिंग फुटेल!

देवेंद्र फडणवीसांचा अमोल कोल्हेंना इशारा


शिरुर : पाच वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या? कुठे जाणार होते? जर सत्य बाहेर आले तर खरा चेहरा आपल्यासमोर उघड होईल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हे यांना दिला आहे.


महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ शिरुर येथे फडणवीस यांची सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली.


फडणवीस म्हणाले, आढळराव यांनी पक्ष बदलला नाही. मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले जागा आणि उमेदवार द्या, आम्ही आमचा खासदार उद्धव ठाकरे यांना दिला आणि पुन्हा निवडूनही आणले आहे. त्यामुळे एका विचारात काम करीत असताना या ठिकाणी पक्ष बदलला असे काही नाही, आम्ही ठरवून हे केले आहे. समोरच्या उमेदवाराने पक्ष बदलला असे म्हणत असेल तर त्यांनी किती वेळा निष्ठा बदलली? गेल्या पाच वर्षात किती फेसबूक पोस्ट टाकल्या. किती वेळा कुठे-कुठे जाणार होते. ते कसे कसे थांबले हे सांगितले तर त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर उघड होईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.


आढळरावांपेक्षा एका गोष्टीत अमोल कोल्हे हे सरस आहेत. आढळराव हे नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही. ते एवढे नाटकी आहेत. त्यांना रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, जुमलेबाजी करता येते. पण एक लक्षात ठेवा हे मी त्यांना सुद्धा सांगतो. लोकं एकदाच नाटकाचं तिकीट घेऊन नाटक पहायला जातात. नाटक जर फ्लॉप निघालं तर पुन्हा कुणीच नाटक पहायला जात नाही. शिरुरच्या जनतेनं एकदा तिकीट घेतलं आहे.


शिरुरची लोकं खरंच हुशार आहेत. मी पाहिलं पाच वर्ष हा गडी फिरकला नाही. आता ते गावोगावी जातात. लोकंही बोलावतात स्वागत करतात, हार घालतात. समोरच्यालाही वाटतं वा.. काय स्वागत केलं अन् नंतर लोकं हळूच विचारतात पाच वर्षे कुठे होता सांगा? खरंच जबरदस्त लोकं आहेत तु्म्ही असे फडणवीसांनी म्हणताच सभेतील लोकांनीही त्यांना हसून दाद दिली.

Comments
Add Comment

Virar crime news : सवतीचा राग अनावर! नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोवर चाकू अन् त्रिशूळने प्राणघातक हल्ला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, संयुक्त मोजणीचे पथक माघारी

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी

Ramabai Ranvir : लेकींच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय आईची अनोखी जिद्द; चप्पल तुटली, अनवाणी धावली अन् ३ किमीची शर्यत जिंकली!

पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली