Devendra Fadnavis : ‘लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो; मला सरकारमधून मुक्त करा’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी


मुंबई : लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. तसेच, मला आता सकारमधून मोकळे करा, अशी विनंती मी भाजपाच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. तसेच संविधान बदलणार या नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला याची कबुली देखील यावेळी फडणवीस यांनी दिली.


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.


फडणवीस म्हणाले की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे आणि नेहरुजींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील. एकट्या भाजपाने इंडिया आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील जनतेचा जनादेश आहे तसा स्वीकारला पाहिजे. आम्ही सखोल आत्मपरीक्षण करू आणि पुढील विधानसभा निवडणुकीत आमचे नुकसान भरून काढू, असे फडणवीस म्हणाले.



नेरेटिव्हचा फटका या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला. प्रचारादरम्यान निवडणुका जिंकल्यानंतर भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका देखिल आम्हाला बसला. यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकार मधून मोकळे करावे, अशी मागणी केली.


आम्हाला २०२९ मध्ये २७.८४ टक्के मत आणि २३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी दीड टक्का कमी मतदान मिळाले आणि नऊ जागा मिळाल्या. आम्हाला लोकांनी नाकारले नाही, असे देखील फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Virar crime news : सवतीचा राग अनावर! नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोवर चाकू अन् त्रिशूळने प्राणघातक हल्ला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, संयुक्त मोजणीचे पथक माघारी

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी

Ramabai Ranvir : लेकींच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय आईची अनोखी जिद्द; चप्पल तुटली, अनवाणी धावली अन् ३ किमीची शर्यत जिंकली!

पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली