Inflation: १०, २०, ३० वर्षानंतर काय असेल १ कोटींची किंमत?

मुंबई: आजकाल प्रत्येकाला करोडपती बनायचे आहे. यामुळे लोकांनीही शेअर मार्केट तसेच स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केली आहे. आजच्या काळात १ कोटी रूपये म्हणजे नक्कीच मोठी रक्कम आहे.


खासकरून रिटायरमेंटबाबत लोक विचार करतात की १ कोटीमुळे प्रत्येक लक्ष्य साधता येईल जसे घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण, अथवा त्यांच्या लग्नाचा खर्च इत्यादी. मात्र तुम्ही विचार केला आहे का की तुम्ही १०, २० अथवा ३० वर्षानंतर रिटायर व्हाल तेव्हा या १ कोटीची किंमत काय असेल.


महागाई वेळेसह पैशाची किंमत कमी करते. आज आपल्याला जी रक्कम मोठी वाटत आहे ती पुढे जाऊन तितकीच मोठी राहत नाही. गरजा पूर्ण करण्यासाठीही ही रक्कम पुरत नाही.



बचत कशी कमी करते महागाई?


आज तुमच्या खात्यात जर १ कोटी असतील तर ते तुम्हाला खूप वाटत असतील. मात्र तुमच्या भविष्यासाठीच्या खर्चांना ते तितके पुरेसे आहेत का? असे यासाठी कारण महागाईसोबत पैशांची किंमत कमी होत जाते.


जर आज एका कारची किंमत १० लाख रूपये आहे तर १५ वर्षानंतर याची किंमत जास्त असेल. विचार करा की १० अथवा १५ वर्षांपूर्वी तुम्ही किराणा सामान अथवा भाड्यासाठी किती रूपये खर्च करत होतात. तेव्हा ते खूप होते मात्र आता ती रक्कम तुम्हाला थोडी वाटू शकते.



१०, २०, ३० वर्षानंतर एक कोटीची किंमत


जर ६ टक्के महागाई दर मानला जर १० वर्षानंतर १ कोटी रूपयांची किंमत ५५.८४ लाख रूपये असेल. जर २० वर्षानंतर ६ टक्के महागाई दर मानला तर १ कोटी रूपयांची किंमत घटून ती ३१.१८ लाख रूपये होईल. तर ३० वर्षांनी १ कोटी रूपयाची किंमत आजच्या हिशेबाने १७.४१ लाख रूपये असेल.

Comments
Add Comment

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय