गणेशोत्सवाच्या काळात 'एफडीए'ची मोहीम बंदच

अन्नपदार्थ तपासणी, भेसळीवर प्रश्नचिन्ह


मुंबई : गणेश चतुर्थी हा प्रमुख सण म्हणून गणला जाताे, येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेशाेत्सावाला सुरूवात हाेणार असून १७ सप्टेंबर रोजी गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनाने समाप्त होईल. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला दरवर्षी साजरा केला जाणारा हा सण भारतभरातील भक्तांसाठी एक महत्त्वाची घटना आहे. या उत्सवात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. हा सण आणखीन गोड व्हावा म्हणून खाद्यपदार्थांमध्ये गोडीच्या पदार्थांचा जास्त समावेश केला जातो.


दरम्यान गणेशोत्सवामध्ये मावा, मिठाई आणि प्रसादाच्या पदार्थांमधून कोणतीही विषबाधा होऊ नये, या पदार्थांची गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) माध्यमातून दरवर्षी विशेष मोहीम राबवली जाते. यंदा मात्र गणेशोत्सव चार दिवसांवर आला असताना ‘एफडीए’ने अशी कोणतीही मोहीम सुरू केलेली नाही. प्रसाद, मावा, मिठाईची गुणवत्ताचाचणी कोण तपासणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.


उत्सवाच्या काळामध्ये गोड पदार्थ, मिठाया, प्रसादाचे पदार्थ, पेढे, मावा, दुग्धजन्य पदार्थ यांची कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या पदार्थांची गुणवत्ता, योग्यतो दर्जा तपासणे अतिशय महत्त्वाचे असते. यापूर्वी गणेशोत्सवाच्या किमान पंधरा ते वीस दिवस आधी ही मोहीम सुरू होऊन ती नाताळपर्यंत चालत असते. परंतू यंदा ‘एफडीए’कडून गुणवत्ता चाचणी मोहिमेची अद्याप सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ बनवणाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘एफडीए’ने दुग्धजन्य पदार्थ कधी तयार केला आहे, त्यात कोणते घटक वापरले आहेत, हे पदार्थ कसे साठवले जातात, त्याची मुदत कधी संपते, याची माहिती विक्रेत्यांना देणे बंधनकारक केले आहे. ‘एफडीए’ राबवत असलेल्या मोहिमेच्या वेळी या बाबींची काटेकोर पालन केले जाते का, याची पडताळणी केली जाते. अन्यथा, संबधित दुकानदारावर कारवाई करण्यात येते. यंदा या निकषांचे योग्यत्याप्रकारे पालन केले जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही प्रसाद आणि मिठाई तयार करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी, कोणते निकष पाळावे, याचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र, मंडळांना अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना अद्याप आलेल्या नाहीत.


दरम्यान, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे विचारणा केली असता, लवकरच तपासणी मोहीम सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Gore : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट

Mumbai :

Central Railway : टिटवाळा येथे १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक; १०/११ सप्टेंबरच्या रात्री लोकल व एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल

Mumbai : मध्य रेल्वेवरील १५-डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याकरिता टिटवाळा येथे १५

SIR voter list : 'एसआयआर' प्रक्रियेनंतर मतदार यादीवर दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप

Tribal Land Ownership : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी आदिवासी बांधवांना मिळणार जमिनींची कायदेशीर मालकी; गांधी जयंतीपर्यंत राज्यभर मोहीम

राज्यातील अपूर्ण वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांसाठी 'विशेष कालबद्ध अभियान' मुंबई : महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील वाघिणीला जेरबंद करण्यासाठी तातडीने रेस्क्यू मोहीम राबवा; नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : अमरावती वन विभागातील वाघिणीच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभ

Pune Land Scam : मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? उच्च न्यायालयाचा पोलीस महासंचालकांना सवाल; दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई : मुंढवा जमीन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले