मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-२०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, नवमतदारांसह मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना या कालावधीत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
दावे आणि हरकती दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भातील यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत दाखल झालेल्या दावे-हरकतींचा तपशीलही निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मुंबई : अमरावती वन विभागातील वाघिणीच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांचा तातडीने बचाव करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला ...
खोटी माहिती दिल्यास तुरुंगवास
दरम्यान, मतदार यादीच्या पुनरिक्षणाच्या अनुषंगाने किंवा मतदार यादीतील नोंदींबाबत खोटे विधान अथवा घोषणा करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची तरतूद आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१नुसार अशा व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.