महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोखाडा (वार्ताहर) :निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, काल २४ रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते. हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून येता २८ तारखेला माझ्या माय बाप जनतेच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.


विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून तशा हालचाली सुरू आहेत अशावेळी महाविकास आघाडीकडून भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे असताना दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार आणि पक्षही ठरलेला नसल्याने महावीकास आघाडीच्या सुनिल भुसारा यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून राज्य स्तरावरून उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याचे चित्र असले तरी सुनील भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म भरला.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी