पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. CJPमध्ये दिसणारे चार-पाच तरुण हे केवळ मोहरे असून, त्यांच्या बैठकींमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाशी संबंधित १८० संघटना सहभागी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्या संघटनांनी भाजपविरोधात नरेटिव्ह तयार केला, त्याच संघटना आता नवीन नाव घेऊन पुन्हा भाजपविरोधात मैदानात उतरल्याची टीका फडणवीस यांनी केली. (CM Devendra Fadnavis)
मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त जीवन जगणारा समाज अशी ओळख त्यांना मिळून ...
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी रामायणातील ‘कालनेमी’ या संदर्भाचा दाखला देत विरोधकांवर निशाणा साधला. रामायणात कालनेमी वेगवेगळे वेष घ्यायचा. कधी साधूचा, तर कधी सामान्य माणसाचा वेष घेऊन तो राक्षसी हेतू घेऊन जायचा. मात्र प्रभू श्रीरामांचे नाव घेतल्यानंतर कालनेमी देखील जिंकू शकला नाही असे फडणवीस म्हणाले.
आम्ही केवळ रामाचे नाव घेणारे नाही, तर प्रभू श्रीरामांनी दिलेल्या तत्त्वांनुसार राज्यकारभार चालवण्याचा प्रयत्न करणारे आहोत. त्यामुळे कार्यपद्धतीतील बदल समजून घेतला पाहिजे असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. (CM Devendra Fadnavis)