सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी करा

कितीही काम केले तर सिंधुदुर्ग वासियांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही


रणरणत्या उन्हात उपस्थित जनसागर पाहून भाजप नेते नारायण राणे झाले भावूक


विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवा


कणकवली : तुम्ही जनतेने एवढ्या मोठ्या संख्येने कुडाळ येथे निलेश राणे, कणकवली येथे नितेश राणे यांचे उमेदवारी अर्ज भरलात. रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आलात.तुमचे हे प्रेम पाहून मी भारावून गेलेलो आहे. सिंधुदुर्गातील जनता, आबालवृद्ध माझ्यावर जे प्रेम करतात. ते पाहून खरेच मी भावूक होतो. माझ्या या आयुष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे मी कितीही काम केले तरी त्यांचे उपकार फेडू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. कारण माझ्यामागे तुमचे आशिर्वाद आहेत. तुमचे प्रेम आहे. मला जशी प्रत्येक निवडणुकीत साथ दिली, तशीच या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून आणून आशिर्वाद द्या आणि विरोधकांचे डिपॉझिट जप्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहास घडवा, असे आवाहन भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केले.


कणकवली येथे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे आदी उपस्थित होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


भाजपा नेते नारायण राणे पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांनी काय केले, ते सांगावे. रस्ते ,पुल ,नळयोजना, पाटबंधारे सिंचन प्रकल्प ही सर्व कामे मी केली आहेत. राहिलेला बॅकलॉक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पूर्ण केला. कणकवली विधानसभा मतदार मतदारसंघात विरोधकांना कोण उमेदवार भेटला नाही. म्हणून पारकरला उमेदवारी दिली आहे. काही दिवस आमच्यासोबत होता, त्याला महामंडळ दिले. मात्र तो प्रामाणिक राहिला नाही. त्यामुळे नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी त्याचे डिपॉजित जप्त करावे, असा घणाघात खा. नारायण राणे यांनी केला.




ज्यांना राहायला, खायला आणि कपडे घालायला शिकवलेल्यांनी माझ्यावर टीका करू नये

तेली, उपरकर यांचा राणेंनी घेतला समाचार


भाजप नेते नारायण राणे यांनी राजन तेली परशुराम उपरकर यांनाचा चांगलाच समाचार घेतला जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. माझ्यावर टीका करतात. अरे तुम्हाला राहायला खायला आणि कपडे घालायला मी शिकवले कसे राहायचे हे तुम्हाला शिकवले ते आता माझ्यावर टीका करतात. हा राजन तेली मुंबई बीकेसीमध्ये ज्या फ्लॅटमध्ये राहतो, त्याला विचारा. चार कोटीचा फ्लॅट मी घेऊन दिला. सतीश सावंतलाही तेथे चार कोटीचा फ्लॅट घेऊन दिला. उपरकर माझ्यासोबत होता, त्यावेळी दुसऱ्याच्या घरात राहत होता. त्याला मी स्वतःचे घर बांधायला लावले. या लोकांनी माझ्यावर टीका करावी आणि ती मी ऐकून घ्यावी, असे होणार नाही. मी टीका टीकेचा हिशोब नियमित चुकता करतो. कारण मी कोणाच्या बसण्या उठण्यात नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी केलेले काम बोलत आहे. तुम्ही एक बालवाडी उभी केली असेल तर दाखवा, अशा शब्दांत खरपूस समाचार उबाठा शिवसेनेत गेलेल्या नेत्यांचा घेतला.

Comments
Add Comment

Ganpati 2026 Special Train: कोकणवासियांसाठी गणपती विशेष ट्रेन, कुठून कधी धावणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: गणेशोत्सवानिमित्त नोकरदारांची आपल्या गावी जाण्यासाठी सध्या एकच गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे, एसटी बस,

Ganesh Utsav 2026 Konkan toll waiver : गणेशभक्तांच्या कोकण प्रवासाला टोलमाफी; अटल सेतू’सह प्रमुख महामार्गांवर पथकर सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

Mumbai To Sawantwadi : गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठे गिफ्ट! मुंबई ते सावंतवाडी दैनिक एक्सप्रेस सेवा आजपासून सुरू; हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू