Maharashtra legislature : विधीमंडळाचे आजपासून विशेष अधिवेशन

मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. आता शनिवारपासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची ९ डिसेंबरला निवड होणार असून त्यासाठी भाजपाकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपाने त्यांच्याकडे घेतले होते. भाजपाने त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाऊ शकते.राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.


७, ८ आणि ९ डिसेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. ७ आणि ८ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड ९ नोव्हेंबरला केली जाणार आहे. पण त्याआधी ८ डिसेंबरला अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यान विधानसभेच्या आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. निवडून आलेले प्रतिनिधी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतील.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या