दोन वर्षांत १६० बेस्ट बसेसचा अपघात; ५० मृत्यू, १५० जखमी

मुंबई : सर्वसामान्यांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसेस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. बसेसमध्ये कंत्राटी पद्धतीवर बसेस आल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षाच्या कालावधीत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १६० अपघात झाले. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी कुर्ला येथील अपघातात सात जणांचा जीव गेला असून ४२ जण जखमी झाले आहेत. वाढत्या बेस्ट अपघातामुळे बेस्ट सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. मात्र गेल्या दोन वर्षात अपघातांच्या घटना वाढत आहेत. सोमवारी कुर्ल्याच्या हादरवणा-या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो आहे. मागील दोन वर्षात विविध ठिकाणी झालेल्या घटनांत बेस्ट बसेसच्या १६० अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.


दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्वीनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. २२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


बेस्ट उपक्रमाच्या प्रचलित पध्दतीनुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे दाखल करण्यात येतो. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार व राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सुमेटाने निकाली काढण्यात आलेल्या एकूण १२ प्रकरणांत जखमींना ९ कोटी ७८ लाग २२ हजार ९७६ रुपये व एकूण ५३ प्रकरणांमध्ये मृतांच्या कायदेशीर वारसांना ११ कोटी २२ लाख ६८ हजार ५६६ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. कुर्ला येथील बेस्ट अपघातात सात जणांचा जीव गेला आहे. तर ४२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बेस्टने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर मुंबई महापालिका बेस्ट प्रशासनाकडून जखमींवरील उपचार मोफत केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

Navi Mumbai Crime: टिंडर ॲपवरून मैत्री, बिअर पाजली, हॉटेलला बोलवून... मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबई: पुन्हा एकदा मुंबईमध्ये डेटिंग ॲपवरून तरूणींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हा संपूर्ण

Nitesh Rane News: हिंदू भूमीच्या रक्षणासाठी वराह देवाचे स्मरण आवश्यक, मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

मुंबई: हिंदू भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांपासून तिचे रक्षण करण्यासाठी वराह देवाचे स्मरण आणि पूजन आवश्यक

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ

Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!

पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व

BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! नवव्या दिवशी कमाईत ४२% वाढ, जगभरात २४६ कोटींचा टप्पा पार

मुंबई : ‘मिर्झापूर: द मुव्ही’ची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. ४ सप्टेंबरला