RAC Railway passengers : आरएसी रेल्वे प्रवाशांसाठी आता सुविधा मिळणार

मुंबई : भारतीय रेल्वेने रोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करत असतात. तिकीट आरक्षित करून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. काही जणांची तिकिटे वेटिंगवर असतात तर काहींना आरएसी तिकीट मिळते. आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना सुविधा मिळत नव्हती.



रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेट आणि उशी दिली जात नव्हती. आता हे सर्व सामान आरएसीधारकांना मिळणार आहे. तसेच आरएसी तिकीट असणाऱ्यांना साइड लोअर बर्थवर अर्ध्या सिटीवर प्रवास करावा लागतो. साइड लोअरच्या खालच्या सीटवर दोन जण मिळून प्रवास करतात. आता या प्रवाशांना कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे बेडरोल आणि इतर सुविधा मिळणार आहे. कोच अटेंडेंट बर्थवर पोहोचल्यावर प्रवाशांना बेडरोल देणार आहे. यामुळे कन्फर्म तिकीटधारक आणि आरएसी तिकीटधारक यांच्यातील भेदभाव संपणार आहे. रेल्वेत आरएसी तिकीट धारकांकडून पूर्ण पैसे घेतले जातात; परंतु कन्फर्म तिकिटासारख्या सुविधा दिल्या जात नव्हत्या.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या