Ratnagiri : रत्नागिरीच्या पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी २० कोटीचा निधी मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यासाठी २० कोटींहून अधिकचा निधी एमआयडीसीने दिला असून, पाटबंधारे विभागाकडून यावर लक्ष ठेवले जाणार आहे.


या दुरुस्तीमुळे ०.३४१ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. पानवल धरणाच्या ६० वर्षांनंतर दुरुस्तीला सुरुवात झाली. सध्या या धरणाला ५० टक्क्यांच्या वर गळती आहे. धरण धोकादायक बनल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक होती. या धरणाच्या मजबुतीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू झाले आहे. पानवल धरण १९६५ ला बांधले आहे. शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापैकी हे एक आहे. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्रोतांतून पाणीपुरवठा होतो. यापैकी पानवल धरणातील साठा दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे. परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे.



शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर पानवल धरण आहे. हे धरण १९५२ मध्ये मंजूर झाले. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता केवळ नैसर्गिक उताराच्या आधाराने शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे एकमेव धरण आहे. पानवल धरणातील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते. शुद्धीकरण करून ते नागरिकांना पुरवले जाते. पानवल धरणातून शहराची पूर्ण गरज भागत नाही; परंतु काही महिने विनाखर्च शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण खूप उपयोगी मानले जाते. पानवल धरणात ५१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर नागरिकांकरिता सहा महिने केला जातो. त्या कालावधीत शीळ धरणातून पाण्याची उचल कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे पालिकेच्या वीज बिलात मोठी कपात होते. या धरणाच्या दुरुस्तीचे काम निर्माण ग्रुपने घेतले असून, वर्षाची त्याला मुदत दिली आहे; परंतु मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड

Pune Rain Alert : पुणेकरांनो, छत्री तयार ठेवा! पावसाचं पुन्हा आगमन; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुणे शहरात उकाडा आणि दमटपणात वाढ झाली आहे. ढगाळ

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला