Air India Flight : भारत-इस्त्रायल विमानसेवा २ मार्चपासून पूर्ववत होणार

नवी दिल्ली : इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्षामुळे ऑगस्ट २०२४ पासून भारत-इस्त्रायल विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता परिस्थिती निवळल्यामुळे या विमानसेवेला पुन्हा सुरुवात करणार असल्याची घोषणा एअर इंडियाने केली आहे. त्यानुसार आगामी २ मार्चपासून तेल अवीवसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत.



यासंदर्भात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून तेल अवीव, इस्रायलला आठवड्यातून ५ उड्डाणे चालवतील. एअरलाइन या मार्गावर त्यांचे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान तैनात करेल, ज्यामध्ये बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २३८ सीट्स असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी नॉन-स्टॉप उड्डाणे चालविली जातील.


दरम्यान इस्रायलचे पर्यटन मंत्री हैम काट्झ यांनी सांगितले की, आवश्यक मंजुरीनंतर दिल्ली-तेल अवीव मार्गावर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एअर इंडिया आणि इस्रायली एअरलाइन ईआय-एआय द्वारे मुंबई ते तेलअवीव थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी आग्रही असल्याचे म्हंटले आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.