GBS Update : पुणे, मुंबई नंतर आता नागपूरातही एका रुग्णाचा मृत्यू; राज्यात मृतांचा आकडा १० वर पोहचला!

नागपूर : नागपुरात GBS आजाराने आणखी एका रुग्णाचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मुंबईनंतर नागपूरमध्येही एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. GBS च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.



मुंबईतील नायर रुग्णालयात GBS आजाराने बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच आता नागपूर येथील पार्डी परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय रुग्णाचा GBSने बळी घेतला आहे. रुग्णाला ११ फेब्रुवारी रोजी पक्षाघाताचा झटका आल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय पक्षाघातामुळे लुळे पडले. त्याला श्वास घ्यायला आणि रक्तदाबाचा त्रासही होत होता.


शुक्रवारी या रुग्णाची प्रकृती खराब झाली असता त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान पुण्यात ८, मुंबईत १ आणि नागपूरमध्ये १ अशा १० रुग्णांचा मृत्यू GBS मुळे झाला आहे. यावर सरकार ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी