
अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्याबद्दलचे सादरीकरण व यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी शिष्टमंडळासह येऊन चर्चा केल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन उपस्थित होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची पहिली राजधानी असलेला राजगड, स्वराज्याच्या विस्तारानंतर राजधानी केलेला रायगड, यांच्यासह एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'मराठा लष्करी भूप्रदेश' (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेच्याआधारे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार शिष्टमंडळाने हा प्रस्ताव सादर केला.
एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर
रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला