Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे 'हे' पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करत आहे. मात्र शरीरातील उष्णतेची काळजी घेण्यासाठी आहारात काही पदार्थांचा शक्यतो समावेश करू नये. या आहारामुळे डिहायड्रेशन, उष्णतेचा ताण यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. खरंतर, उन्हाळ्यात भूक आणि तहान जास्त लागते. उष्णता, कडक उन्हामुळे आणि आर्द्रतेमुळे भूक कमी होते आणि त्यामुळे खाण्याची आणि पिण्याची इच्छा देखील कमी होते. अशात पालेभाज्या, फळे खाणे योग्य राहील. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने चक्कर येणे, थकवा जाणवणे या प्रकारचा त्रास होत नाही.



पुढील पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात :-


मसालेदार
मसालेदार पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते. यामुळे पोटात जळजळ, आम्लपित्त आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात . उन्हाळ्यात फक्त हलके मसालेदार पदार्थच खावेत, कारण मिरची, लवंग, दालचिनी, जिरे, वेलची यांसारखे मसाले शरीराची उष्णता वाढवू शकतात.


तळलेले अन्न
उन्हाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते. याशिवाय, तळलेल्या अन्नातही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.


फास्ट फूड
आजकाल लोकांना बाहेरचे जेवण खूप आवडते, ज्यामध्ये फास्ट फूड जास्त खाणे पसंत केले जाते. पण, फास्ट फूडमध्ये पीठ, तेल आणि मसाले जास्त प्रमाणात असतात. या गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहेत आणि उन्हाळ्यात त्या टाळल्या पाहिजेत.


चहा आणि कॉफी
उन्हाळ्यात जास्त चहा आणि कॉफीचे सेवन करू नये, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिन शरीराला डिहायड्रेट करते आणि शरीराचे तापमान वाढवते.


मांसाहारी
उन्हाळ्यात मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे, कारण मांसाहारी पदार्थ पचायला वेळ लागतो. यामुळे शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या