India attack pakistan: १०० किमी आत घुसून मारले...५४ वर्षांनी तीन्ही दलांनी मिळून केली पाकिस्तानवर कारवाई

नवी दिल्ली: भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला आहे. ही कारवाई ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तीनही दलांनी संयुक्तपणे सहभाग घेतला होता. १९७१ नंतर ही पहिली वेळ आहे जेव्हा भारताच्या तीनही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली.



१०० किमी आत घुसून मारले


भारताने पाकिस्तान आणि पीओकेच्या ज्या ९ ठिकाणांवर एअरस्ट्राईक केला त्यात काही आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर स्थित आहेत. खासकरून बहावलूपर जो एकेकाळी जैश-ए-मोहम्मदचा गढ मानला जात होता हे ठिकाण १०० किमी दूर आहे. तर मुरीदके ३० किमी आणि गुलपूर ३५ किमी आत आहे.



दहशतवादी ठिकाणांवर थेट हल्ला


या ऑपरेशनमध्ये एकूण ९ ठिकाणांना लक्ष्य बनवण्यात आले. यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर येथील मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाच्या मुरीदके येथील ठिकाणांचा समावेश आहे. सैन्याच्या मते, याच ठिकाणी भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना बनवण्यात आली होती आणि त्यांनाच टार्गेट करण्यात आले.



कसा झाला हल्ला?


तीनही दलांनी या ऑपरेशनमध्ये आपल्या आधुनिक शस्त्रांचा वापर केला. खासकरून Loitering Ammunitionचा उपयोग झाला जे सरळ शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करतात. तसेच तिथेच ब्लास्ट करतात.



संयमी मात्र कडक कारवाई


भारतीय लष्कराने हे ही म्हटले की हे ऑपरेशन पूर्णपणे संयमी, योग्य पद्धतीचे होते. भारताने टार्गेट निवडीचे काम अतिशय विचारपूर्वक केले तसेच दहशतवादी ठिकाणांवरच हल्ला केला. हे पाऊल पहलगाम हल्ल्यानंतर उचलण्यात आले.



पंतप्रधान मोदी आणि NSA डोवाल यांनी सांभाळली कमान


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण रात्रभर या ऑपरेशनवर लक्ष ठेवले. ऑपरेशन पूर्ण होताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकी NSA आणि परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांना संपूर्ण माहिती दिली.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?