पाण्याला दुर्गंधी आल्याने उघडकीस आला प्रकार
Mumbai : मुंबई येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी आणि जनहिताशी संबंधित चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र ...
अरिसिपालयम परिसरातील गुणाबालन गल्लीत राहणारे पुजारी रमेश हे कुंभकोणम येथील प्रवास आटोपून सोमवारी घरी परतले होते. मंगळवारी जेव्हा घरातील नळाच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा संशय आल्याने रमेश यांनी आपल्या मुलासह छतावर जाऊन पाण्याच्या टाकीची पाहणी केली. टाकीचे झाकण उघडून पाहताच आत एक प्लास्टिकची गोणी तरंगताना दिसली, ज्यामध्ये मानवी शरीराचे अवयव भरलेले होते.
शेजाऱ्याच्या छतावरही सापडली दुसरी पिशवी
हा प्रकार पाहताच घाबरलेल्या रमेश यांनी तात्काळ पल्लापट्टी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना शेजारच्या घराच्या छतावरही अशीच एक संशयित पिशवी आढळली. पोलिसांनी दोन्ही पिशव्या जप्त करून अवयवांच्या शवविच्छेदनासाठी (Autopsy) जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
दागिन्यांसाठी हत्या ? पोलिसांचा प्राथमिक अंदाज
मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब असल्याने ही हत्या 'लूटमारीच्या उद्देशाने' (Murder for gain) करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गजबजलेल्या विस्तारामुळे टाकीत लपवले अवयव
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा आहे. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे बाहेर नेणे आरोपींना शक्य नव्हते. कोणाच्या नजरेस पडू नये या भीतीने त्यांनी मृतदेहाचे अवयव गोणीत भरून छतावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये लपवून ठेवले." सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणी अधिक तपास करत असून, मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.